इयत्ता १ ली ते १० वी सर्व विषयांवरील टेस्ट
बोधकथा रोजचा परिपाठ
१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी
आकारिक चाचणी 2 संकलित चाचणी 1 संकलित चाचणी २ वर्णनात्मक नोंदी स्कॉलरशिप सराव पेपर प्रश्नमंजुषा ५ वी स्कॉलरशिप ८ वी स्कॉलरशिप परिपाठ प्रमाणपत्र Groups Apps

इयत्ता दुसरी मराठी

    इयत्ता दुसरीच्या सर्व विषयाच्या टेस्ट minishala.com या आपल्या वेबसाईट वर देण्यात आल्या आहेत.सर्व टेस्ट सोडवताना काळजीपूर्वक प्रश्न वाचावा त्यानंतर उत्तराचा पर्याय निवडावा.अनेक प्रश्न या टेस्ट मध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत.टेस्ट सोडवण्याआधी आपण जर टेस्ट घटकांचा अभ्यास केला तर टेस्ट अधिक सोपी वाटेल व चांगला सराव होण्यास मदत होईल. दुसरी APP डाऊनलोड

अ.क्र. घटक लिंक
1देवा तुझे किती?सोडवा
2डिंगोरीसोडवा
3चतुर हिराबाईसोडवा
4फुलपाखरूसोडवा
5चंपकला शाबासकी मिळालीसोडवा
6वडेश बहरलासोडवा
7मी आहे असासोडवा
8भाज्यांचे भांडण, आजीचे जेवणसोडवा
9हळूच या हो, हळूच यासोडवा
10चिंटू रुसला, चिंटू हसलासोडवा
11भेळसोडवा
12पाऊस फुलेसोडवा
13एक तांबडा भोपळासोडवा
14झरीपाडासोडवा
15चुलीवरची खीरसोडवा
16दिनदर्शिकासोडवा
17हिवाळासोडवा
18संगणकाची करामतसोडवा
19कणभर तीळसोडवा
20आपला भारतसोडवा
21मंगळावरची शाळासोडवा
22फुलांचे संमेलनसोडवा
23फुग्या रेसोडवा
24मांजरांची दहीहंडीसोडवा
25चांदोबाच्या देशातसोडवा
26मोरपिसारासोडवा
27चित्रवाचनसोडवा
बोधकथा १ :
                 एकदा एक गुरु शिष्य जंगलातून गावाकडे जात असतात. जंगलात अनेक हिंस्त्र प्राणी राहत असतात. जंगलातून जाताना त्यांच्या अचानक लक्षात येते कि कुणीतरी त्यांचा पाठलाग करीत आहे. शिष्य मागे वळून पाहतो त्याची तर बोबडीच वळते. त्यांच्या मागे एक भलामोठा वाघ असतो. तो विचार करतो आपण पळून जावे का? पण त्याचा आपल्या गुरुवर विश्वास असतो. गुरु जे करतील ते आपणही करावे या विचाराने तो शांत बसतो.तो गुरुना विचारतो आता आपण काय करायचे. गुरु शांत आणि प्रसन्न मुद्रेने त्याला उत्तर देतात कि आपण जर आता पळालो तर त्या वाघाचा वेग आपल्यापेक्षाही जास्त आहे.आपण त्याचा प्रतिकार करायचा प्रयत्न केला तर त्याची शक्ती आपल्या दसपट जास्त आहे मग आपण विरोध करून तरी काय उपयोग? आपण केवळ त्याला सामोरे जावू. शिष्य अजूनच घाबरतो. गुरु मात्र निश्चिंत असतात. ते ध्यान करण्यास सुरुवात करतात. वाघ त्या दोघांच्या आणखी जवळ येतो. शिष्याची दातखीळ बसते त्याचे पाय थरथरु लागतात. तो चक्कर येवून पडतो. नंतर त्याला जाग येते तेंव्हा त्याचे गुरु त्याच्या डोक्याशी ध्यान लावून बसलेले त्याला दिसून येतात. तो विचारतो आपण दोघेही जिवंत कसे? गुरु त्याला म्हणतात, आपल्या मनात जर शांतता आणि प्रेम असेल तर ध्यानाच्या माध्यमातून आपण तो परिणाम वातावरणातही निर्माण करू शकतो. वाघाला पाहून तू घाबरलास पण मी माझ्या मनातील शांतता आणि प्रेम ध्यानाच्या माध्यमातून वाघाच्या मनात प्रसारित केले तो जवळ पण त्याला माझ्या मनातले प्रेम जाणवले व आपल्याला धोका नाही हे जाणवून तो दूर निघून गेला. 

 तात्पर्य- प्रेम आणि शांतता हे सहज उपलब्ध असणारे मानवी गुण आहेत. याचा वापर केला गेला पाहिजे.

1 Comments

نموذج الاتصال