१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी
संकलित आकारिक प्रश्नपत्रिका रोजचा परिपाठ
PAT-1 उत्तरसूची (2025-26) C-TET केंद्रप्रमुख टेस्ट्स

इयत्ता सातवी इतिहास आणि नागरिकशास्त्र धडा 9: मराठ्यांचा स्वातंत्र्यसंग्राम स्वाध्याय

इयत्ता सातवी इतिहास आणि नागरिकशास्त्र धडा नऊ: मराठ्यांचा स्वातंत्र्यसंग्राम स्वाध्याय

इयत्ता सातवी इतिहास आणि नागरिकशास्त्र धडा नऊ: मराठ्यांचा स्वातंत्र्यसंग्राम स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता सातवीच्या इतिहास आणि नागरिकशास्त्र विषयातील धडा नऊ "मराठ्यांचा स्वातंत्र्यसंग्राम" हा पाठ मराठ्यांचा मुघलांविरुद्धचा स्वातंत्र्यलढा, छत्रपती संभाजी महाराज, राजाराम महाराज, आणि महाराणी ताराबाई यांचे पराक्रम यांचे शैक्षणिक वर्णन करतो. या स्वाध्यायात प्रश्नोत्तरे, विश्लेषण, आणि ऐतिहासिक घटनांचे वर्णन यांचा समावेश आहे, जे विद्यार्थ्यांना इतिहासाची जाणीव करून देण्यास मदत करते.

मराठ्यांचा स्वातंत्र्यसंग्राम - प्रश्न १: योग्य पर्याय निवडा

प्रश्न १: योग्य पर्याय निवडा

१) औरंगजेब यांच्या पराक्रमाने जेरीस आला होता.
(अ) शाहजादा अकबर (ब) छत्रपती संभाजी महाराज (क) छत्रपती राजाराम महाराज
उत्तर: छत्रपती संभाजी महाराज
२) बादशाहाच्या तंबूवरील सोन्याचा कळस कापणारे
(अ) संताजी व धनाजी (ब) संताजी घोरपडे व विठोजी चव्हाण (क) खंडो बल्लाळ व रूपाजी भोसले
उत्तर: संताजी घोरपडे व विठोजी चव्हाण
३) गोव्याच्या लढाईत पराक्रमाची शर्थ करणारा
(अ) येसाजी कंक (ब) नेमाजी शिंदे (क) प्रल्हाद निळाजी
उत्तर: येसाजी कंक

मराठ्यांचा स्वातंत्र्यसंग्राम - प्रश्न २: पाठात शोधून लिहा

प्रश्न २: पाठात शोधून लिहा

१) संभाजी महाराजांना जंजिन्याची मोहीम अर्धवट सोडून माघारी का फिरावे लागले?
१) मराठी मुलखाला उपद्रव देणाऱ्या जंजिऱ्या सिद्दीविरुद्ध इ.स.१६८२ मध्ये मोहीम उघडली.
२) मराठी सैन्याने त्याच्या ताब्यातील दंडाराजपुरी या किल्ल्याला वेढा घातला आणि जंजिऱ्यावर तोफांचा भडीमार केला.
३) परंतु त्याच वेळी मुघलांचे सैन्य स्वराज्यावर चालून आले. त्यामुळे संभाजी महाराजांना जंजिन्याची मोहीम अर्धवट सोडून माघारी फिरावे लागले.
२) संभाजी महाराजांनी पोर्तुगिजांना धडा शिकवण्याचे का ठरवले?
१) गोव्याचे पोर्तुगीज हे शिवाजी महाराजांच्या काळापासूनच स्वराज्यविस्ताराच्या कार्यात अडथळा आणत असत.
२) महाराजांच्या मृत्यूनंतर मुघलांनी स्वराज्यावर आक्रमण केले.
३) पोर्तुगीजांनी संभाजी महाराजांविरुद्ध औरंगजेब बादशाहाशी हातमिळवणी केली. म्हणून संभाजी महाराजांनी पोर्तुगिजांना धडा शिकवण्याचे ठरवले.
३) राजाराम महाराजांनी जिंजीला जाताना स्वराज्याच्या रक्षणाची जबाबदारी कोणावर सोपवली?
उत्तर: रामचंद्रपंत अमात्य आणि शंकरजी नारायण

नोट: पाठ्यपुस्तकात याबाबत स्पष्ट उल्लेख आहे की राजाराम महाराजांनी जिंजीला जाताना स्वराज्याच्या रक्षणाची जबाबदारी रामचंद्रपंत अमात्य आणि शंकरजी नारायण यांच्यावर सोपवली होती.

४) महाराणी ताराबाईंच्या पराक्रमाचे वर्णन देवदत्त या कवीने कोणत्या शब्दांत केले आहे?
महाराणी ताराबाईंच्या पराक्रमाचे वर्णन देवदत्त या कवीने पुढील शब्दांत केले आहे:
ताराबाई रामराणी | भद्रकाली कोपली | दिल्ली झाली दीनवाणी | दिल्लीसहाचे गेले पाणी | रामराणी भद्रकाली | रणरंगी क्रुद्ध झाली | प्रयत्नाची वेळ आली | मुगल हो सांभाळा ||
याचा अर्थ:
“राजारामांची पत्नी ताराबाई भद्रकालीप्रमाणे कोपायमान झाली. त्यामुळे दिल्लीच्या बादशहाची – औरंगजेबाची अवस्था दीनवाणी झाली, त्याचे तेज हरपले. भद्रकालीप्रमाणे पराक्रमी असणारी राजारामांची राणी ताराबाई मुघलांशी युद्ध करायला सज्ज होऊन तिने रणरागिणीचे रूप धारण केले; म्हणून मुघलांनो, आता स्वतःला सांभाळा!”

मराठ्यांचा स्वातंत्र्यसंग्राम - प्रश्न ३: का ते लिहा

प्रश्न ३: का ते लिहा

१) औरंगजेबाने आपला मोर्चा आदिलशाही व कुतुबशाही राज्यांकडे वळवला.
१) मराठ्यांचे राज्य जिंकण्याच्या इराद्याने औरंगजेब दक्षिणेत आला.
२) पण, संभाजी महाराजांच्या पराक्रमामुळे व युद्धकौशल्यामुळे दीर्घकाळ प्रयत्न करूनही त्याला हे राज्य जिंकता आले नाही.
त्यामुळे त्याने ही मोहीम स्थगित करून आपला मोर्चा आदिलशाही व कुतुबशाही या राज्यांकडे वळवला.
२) संभाजी महाराजांनंतर मुघलांशी निकराचा लढा देण्यासाठी मराठे सज्ज झाले.
१) औरंगजेबाने संभाजी महाराजांना अत्यंत निर्दयीपणे ठार केले.
२) मराठ्यांच्या या छत्रपतीने स्वाभिमान न सोडता अतिशय धैर्याने मृत्यूला तोंड दिले.
३) त्यांच्या बलिदानाची प्रेरणा घेऊन मुघलांशी निकराचा लढा देण्यासाठी मराठे सज्ज झाले.
३) महाराणी येसूबाईंच्या नेतृत्वाखाली रायगड लढवावा, असे धोरण ठरवण्यात आले.
१) संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचे राज्य जिंकण्यासाठी औरंगजेबाने झुल्फिकारखानाला रायगडावर पाठवले.
२) झुल्फिकारखानाने रायगडाला वेढा घातला त्या वेळी गडावर राजाराम महाराज, त्यांची पत्नी ताराबाई, संभाजी महाराजांची पत्नी येसूबाई व पुत्र शाहू होते.
३) या सर्वांचे एकत्र राहणे धोक्याचे होते.
४) म्हणून राजाराम महाराजांनी या वेढ्यातून बाहेर पडावे व महाराणी येसूबाईंच्या नेतृत्वाखाली रायगड लढवावा, असे धोरण ठरवण्यात आले.

FAQ आणि शेअरिंग

FAQ आणि शेअरिंग

मुलांनो, हा स्वाध्याय तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. त्यांनाही अभ्यास करताना मदत होईल.
हा स्वाध्याय तुमच्या मित्रांसोबत WhatsApp, Facebook, किंवा ईमेलद्वारे शेअर करा. स्वाध्यायाची माहिती आवडल्यास खाली कमेंट करून सांगा!
स्वाध्यायाची माहिती आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा.
आपल्या अभिप्रायाने आम्हाला प्रोत्साहन मिळेल. खालील कमेंट विभागात आपले विचार लिहा!

इयत्ता सातवी इतिहास आणि नागरिकशास्त्र धडा नऊ: मराठ्यांचा स्वातंत्र्यसंग्राम स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता सातवी इतिहास आणि नागरिकशास्त्र विषयाचा धडा नऊ: मराठ्यांचा स्वातंत्र्यसंग्राम यामध्ये मराठ्यांचा मुघलांविरुद्धचा स्वातंत्र्यलढा, छत्रपती संभाजी महाराज, राजाराम महाराज, आणि महाराणी ताराबाई यांचे पराक्रम यांचे शैक्षणिक वर्णन आहे. या स्वाध्यायात प्रश्नोत्तरे, विश्लेषण, आणि ऐतिहासिक घटनांचे वर्णन यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त इतिहास अभ्यास साहित्य आणि इतिहासाची जाणीव करून देण्याची संधी येथे उपलब्ध आहे. Iyatta Satavi Itihas Swadhay PDF आणि गाइड डाउनलोड करा.

कीवर्ड्स: इयत्ता सातवी इतिहास स्वाध्याय, मराठ्यांचा स्वातंत्र्यसंग्राम, धडा नऊ स्वाध्याय, 7वी इतिहास स्वाध्याय, इतिहास अभ्यास, मराठ्यांचा स्वातंत्र्यसंग्राम प्रश्न आणि उत्तरे, Iyatta Satavi Itihas Swadhay, Iyatta Satavi Itihas guide, स्वाध्याय PDF, Maratha freedom struggle, Sambhaji Maharaj, Tarabai

संबंधित स्वाध्याय: इयत्ता सातवीच्या इतर इतिहास आणि नागरिकशास्त्र अभ्यास पाठांचे स्वाध्याय शोधण्यासाठी:

Previous Post Next Post

نموذج الاتصال