१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी
संकलित आकारिक प्रश्नपत्रिका रोजचा परिपाठ
PAT-1 उत्तरसूची (2025-26) C-TET केंद्रप्रमुख टेस्ट्स

इयत्ता सातवी इतिहास आणि नागरिकशास्त्र धडा 10: मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार स्वाध्याय

इयत्ता सातवी इतिहास आणि नागरिकशास्त्र धडा दहावा: मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार स्वाध्याय

इयत्ता सातवी इतिहास आणि नागरिकशास्त्र धडा दहावा: मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता सातवीच्या इतिहास आणि नागरिकशास्त्र विषयातील धडा दहावा "मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार" हा पाठ मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार, बाळाजी विश्वनाथ, पहिला बाजीराव, आणि कान्होजी आंग्रे यांचे योगदान यांचे शैक्षणिक वर्णन करतो. या स्वाध्यायात प्रश्नोत्तरे, विश्लेषण, आणि ऐतिहासिक घटनांचे वर्णन यांचा समावेश आहे, जे विद्यार्थ्यांना इतिहासाची जाणीव करून देण्यास मदत करते.

मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार - प्रश्न १: म्हणजे काय?

प्रश्न १: म्हणजे काय?

१) चौथाई
कोणत्याही सत्तेला अन्य प्रदेशातून महसुली उत्पन्नाच्या एक-चतुर्थांश भाग गोळा करण्याचा जो हक्क असतो, त्याला ‘चौथाई’ असे म्हणतात.
२) सरदेशमुखी
कोणत्याही सत्तेला अन्य प्रदेशात जो महसूल जमा होतो, त्या महसुली उत्पन्नाच्या एक-दशांश भाग वसूल करण्याच्या अधिकाराला ‘सरदेशमुखी’ असे म्हणतात.

मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार - प्रश्न २: एका शब्दात लिहा

प्रश्न २: एका शब्दात लिहा

१) बाळाजी मूळचा कोकणातील या गावचा होता
उत्तर: श्रीवर्धन
२) बुंदेलखंडात याचे राज्य होते
उत्तर: छत्रसाल
३) या ठिकाणी बाजीरावाचा मृत्यू झाला
उत्तर: रावेरखेडी
४) पोर्तुगिजांचा पराभव यांनी केला
उत्तर: चिमाजी

मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार - प्रश्न ३: लिहिते व्हा

प्रश्न ३: लिहिते व्हा

१) कान्होजी आंग्रे
१) कान्होजी आंग्रे हा मराठ्यांच्या आरमाराचा प्रमुख होता.
२) त्याने महाराणी ताराबाईंची बाजू घेऊन शाहू महाराजांच्या मुलखावर हल्ले केले.
३) त्यामुळे त्याच्यासमोर कठीण परिस्थिती निर्माण झाली. या परिस्थितीमध्ये शाहू महाराजांनी बाळाजीला कान्होजी आंग्रेविरुद्ध पाठवले.
४) बाळाजीने युद्ध टाळून उदारतेने कान्होजीला शाहू महाराजांकडे वळवले.
२) पालखेडची लढाई
१) मुघल बादशाह फार्रुखसियर याने निजाम-उल-मुल्क याची दख्खनचा सुभेदार म्हणून नेमणूक केली.
२) बादशाहाने मराठ्यांना दक्षिणेतील मुघल सुभ्यांतून चौथाई-सरदेशमुखी वसूल करण्याचे अधिकार दिले होते. याला निजामाचा विरोध होता.
३) निजामाने पुणे परगण्याचा काही भाग जिंकून घेतला.
४) बादशाहाने निजामाला शह देण्याचे ठरवले. मराठ्यांनी निजामाचा औरंगाबादजवळ पालखेड येथे पराभव केला. तेव्हा त्याने मराठ्यांचा चौथाई-सरदेशमुखी वसूल करण्याचा हक्क मान्य केला. हीच पालखेडची लढाई होय.
३) बाळाजी विश्वनाथ
१) शाहू महाराजांची मुघलांच्या कैदेतून मुक्तता झाल्यावर त्यांनी बाळाजी विश्वनाथ भट याला पेशवा केले.
२) बाळाजी मूळचा कोकणातील श्रीवर्धन गावचा. तो कर्तृत्ववान व अनुभवी होता.
३) शाहू महाराज हेच मराठ्यांच्या राज्याचे खरे वारस आहेत, हे पटवून देऊन अनेक सरदारांना त्याने शाहू महाराजांकडे वळवले.
४) इ.स. १७२० मध्ये बाळाजी विश्वनाथ यांचा मृत्यू झाला.
४) पहिला बाजीराव
१) शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथ यांच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा बाजीराव (पहिला) याची इ.स. १७२० मध्ये पेशवेपदी नेमणूक केली.
२) पेशवेपदाच्या २० वर्षांच्या कालावधीत त्याने मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार घडवून आणला.
३) त्याने निजामाचा पालखेडच्या लढाईत पराभव करून माळव्याच्या सुभेदाराची सनद मिळवली.
४) बुंदेलखंडावर वर्चस्व मिळवले व वसईचा किल्ला जिंकून घेतला.

मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार - प्रश्न ४: कारणे लिहा

प्रश्न ४: कारणे लिहा

१) मराठेशाहीत स्वतंत्र दोन राज्ये निर्माण झाली.
१) मुघलांच्या कैदेतून सुटलेल्या शाहू महाराजांनी मागणी केलेला छत्रपतीपदावरील हक्क ताराबाईंनी अमान्य केला.
२) त्यामुळे शाहू महाराजांनी खेड येथे त्यांचा पराभव करून सातारा जिंकला व स्वतःस राज्याभिषेक करून घेतला.
३) ताराबाईंनी शाहू महाराजांशी असलेला आपला विरोध पुढे चालू ठेवून पुन्हा पन्हाळगडावर आपला मुलगा दुसरा शिवाजी यास छत्रपती म्हणून घोषित केले व दुसरी स्वतंत्र गादी निर्माण केली.
त्यामुळे मराठेशाहीत स्वतंत्र दोन राज्ये निर्माण झाली.
२) आझमशाहाने छत्रपती शाहू महाराजांची कैदेतून सुटका केली.
१) औरंगजेबाच्या मृत्यूमुळे दिल्लीच्या गादीसाठी त्याच्या मुलांमध्ये संघर्ष सुरू झाला.
२) दक्षिणेत असलेला शाहजादा आझमशहा गादी मिळवण्यासाठी उत्तरेकडे निघाला.
३) आझमशहाला असे वाटले की, कैदेत असलेल्या शाहू महाराजांना मुक्त केल्यास महाराणी ताराबाई व शाहू महाराज यांच्यात छत्रपतींच्या गादीसाठी कलह होईल.
४) यांच्यातील संघर्षामुळे मराठ्यांचे सामर्थ्य कमी होईल; म्हणून आझमशहाने छत्रपती शाहू महाराजांची कैदेतून सुटका केली.
३) दिल्ली दरबाराला मराठ्यांच्या साहाय्याची गरज होती.
१) औरंगजेबाच्या मृत्यूनंतर दिल्लीची मुघल सत्ता कमकुवत झाली होती.
२) मुघल सत्तेला वायव्येकडून होणाऱ्या इराणी व अफगाणी आक्रमणांची भीती होती.
३) आसपासच्या पठाण, राजपूत, जाट, रोहिले या स्थानिक सत्ताधीशांचाही धोका मुघल सत्तेला होता.
४) दरबारात चालणारी स्पर्धा व संघर्ष यांमुळेही ही सत्ता आतून पोखरली गेली होती, म्हणून दिल्ली दरबाराला मराठ्यांच्या साहाय्याची गरज होती.

FAQ आणि शेअरिंग

FAQ आणि शेअरिंग

मुलांनो, हा स्वाध्याय तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. त्यांनाही अभ्यास करताना मदत होईल.
हा स्वाध्याय तुमच्या मित्रांसोबत WhatsApp, Facebook, किंवा ईमेलद्वारे शेअर करा. स्वाध्यायाची माहिती आवडल्यास खाली कमेंट करून सांगा!
स्वाध्यायाची माहिती आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा.
आपल्या अभिप्रायाने आम्हाला प्रोत्साहन मिळेल. खालील कमेंट विभागात आपले विचार लिहा!

इयत्ता सातवी इतिहास आणि नागरिकशास्त्र धडा दहावा: मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता सातवी इतिहास आणि नागरिकशास्त्र विषयाचा धडा दहावा: मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार यामध्ये मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार, बाळाजी विश्वनाथ, पहिला बाजीराव, आणि कान्होजी आंग्रे यांचे योगदान यांचे शैक्षणिक वर्णन आहे. या स्वाध्यायात प्रश्नोत्तरे, विश्लेषण, आणि ऐतिहासिक घटनांचे वर्णन यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त इतिहास अभ्यास साहित्य आणि इतिहासाची जाणीव करून देण्याची संधी येथे उपलब्ध आहे. Iyatta Satavi Itihas Swadhay PDF आणि गाइड डाउनलोड करा.

कीवर्ड्स: इयत्ता सातवी इतिहास स्वाध्याय, मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार, धडा दहावा स्वाध्याय, 7वी इतिहास स्वाध्याय, इतिहास अभ्यास, मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार प्रश्न आणि उत्तरे, Iyatta Satavi Itihas Swadhay, Iyatta Satavi Itihas guide, स्वाध्याय PDF, Maratha expansion, Bajirao Peshwa, Balaji Vishwanath

संबंधित स्वाध्याय: इयत्ता सातवीच्या इतर इतिहास आणि नागरिकशास्त्र अभ्यास पाठांचे स्वाध्याय शोधण्यासाठी:

Previous Post Next Post

نموذج الاتصال