१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इयत्ता पाचवी मराठी पाठ 15: आपल्या समस्या – आपले उपाय चे स्वाध्याय, प्रश्नोत्तरे

इयत्ता पाचवी मराठी - पाठ: आपल्या समस्या – आपले उपाय स्वाध्याय

इयत्ता पाचवी मराठी - पाठ: आपल्या समस्या – आपले उपाय स्वाध्याय

प्रश्न १: एका वाक्यात उत्तरे लिहा

अ) तुम्ही कधी गर्दी असणाऱ्या रस्त्यावर गेला आहात का?
हो, आम्ही गर्दी असणाऱ्या रस्त्यावर गेलो आहोत.
आ) रस्त्यावर कोणत्या वेळेला जास्त गर्दी असते?
रस्त्यावर संध्याकाळच्या आणि सकाळच्या वेळेला जास्त गर्दी असते.
इ) वाहतूक कोंडीमुळे कोणकोणत्या प्रकारचे प्रदूषण वाढते?
वाहतूक कोंडीमुळे वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण या प्रकारचे प्रदूषण होते.
ई) आपण कचरा कशाला म्हणतो?
ज्या गोष्टींचा आपल्याला उपयोग होत नाही, ज्या वस्तू टाकावू असतात त्यांना आपण कचरा म्हणतो.

प्रश्न १: दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा

इ) नेमक्या त्या वेळेलाच जास्त गर्दी का होते असे तुम्हाला वाटते?
सकाळच्या वेळेला सर्व लोक कामाला जाण्यासाठी घराबाहेर पडतात. आणि संध्याकाळच्या वेळेला लोक कामावरून घरी येतात तर काही जन बाजारात खरेदी करायला जातात.
ई) वाहतूक कोंडीमुळे कोणत्या समस्या निर्माण होतात?
वाहतूक कोंडीमुळे एकाच ठिकाणी वाहने थांबून राहिल्याने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणवर वायू प्रदूषण होते. गाड्यांचे हॉर्न चालू असल्याने ध्वनी प्रदूषण देखील होते.

प्रश्न १: थोडक्यात उत्तरे लिहा

उ) वाहतूक कोंडी होऊ नये, म्हणून काय काय केले पाहिजे असे तुम्हाला वाटते?
वाहतूक कोंडी होऊ नये, म्हणून पुढील उपाय करता येतील. १) शक्यतो खाजगी वाहनाचा वापर टाळा. २) रस्त्यावरील सर्व वाहतुकीच्या नियमांचे पालन करा.
ऊ) हे प्रदूषण कमी व्हावे, म्हणून काय काय करता येईल?
वायू प्रदूषण कमी होण्यासाठी उपाययोजना: १) सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करा. २) गर्दीत विनाकारण गाडी चालू ठेऊ नका.
ए) चौकाचौकांतील ध्वनिप्रदूषण, वायुप्रदूषण कमी करण्यासाठी उपाय सुचवा.
वायू प्रदूषण कमी होण्यासाठी उपाययोजना: १) सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करा. २) चौकात थांबून उगाचच गाडी चालू ठेऊ नका.

प्रश्न २: योग्य पर्याय निवडा

अ) एखाद्या गाडीचा छोटासा अपघात झालेला आहे. तो पाहण्यासाठी तेथे गर्दी करणे.
आ) ओळखीची व्यक्ती रस्त्यात भेटल्यास, भर रस्त्यात वाहन उभे करून गप्पा मारणे.
इ) दुकानात वस्तू आणायला गेल्यावर आपले वाहन पार्किंगच्या ठिकाणी लावणे.
ई) गर्दीमधून जाताना जोरजोराने हॉर्न वाजवणे.

प्रश्न ३: थोडक्यात उत्तरे लिहा

आ) घरातील कचऱ्यात कोणकोणत्या वस्तू असतात?
घरातील कचऱ्यात धूळ, भाज्यांचे देठ, फळाच्या साली, कागदाचे कपटे, विविध वस्तूंच्या पिशव्या, पेन, प्लास्टिक पिशव्या, टाकावू अन्न, रिकामे खोके इ.
इ) तुमच्या घरातील ओला व सुका कचरा कोणता ते सांगा.
ओला कचरा: फळांच्या साली, भाज्यांचे देठ, शिळे अन्न, खरकटे, खराब झालेल्या भाज्या. सुका कचरा: कागद, प्लास्टिक पिशव्या, पुठ्ठ्याचे खोके, बाटल्या.
ई) तुमच्या घरातील कचऱ्याची विल्हेवाट तुम्ही कशी लावता ते सांगा.
घरात तयार होणाऱ्या कचऱ्याची ओला कचरा व सुका कचरा अशी वेगवेगळ्या डब्यांत विभागणी केली जाते. ओला कचरा घराच्या मागे असलेल्या खड्ड्यात टाकून त्यापासून खत तयार केले जाते.
उ) कचऱ्यातील कोणकोणत्या गोष्टींवर प्रक्रिया करून त्यातून नवीन गोष्टी तयार होऊ शकतात?
१) कागदावर प्रक्रिया करून त्यापासून पुन्हा एक उपयोगी कागद निर्माण करता येतो. २) काच आणि प्लास्टिक वस्तू वितळवून त्यापासून नव्या गोष्टी तयार करता येतात.
ऊ) तुमच्या वर्गातील कचऱ्यामध्ये कोणकोणत्या वस्तू असतात?
वर्गातील कचऱ्यात कागद, खराब पेन, खोडरबरचे तुकडे, पेन्सिलचे तुकडे, खाऊचे कागद, मोडलेल्या पट्ट्या इत्यादी वस्तू असतात.
ए) वर्गात कचरा होऊ नये, म्हणून तुम्ही कोणती काळजी घ्याल?
वर्गात कचरा होऊ नये म्हणून पुढील काळजी घेता येईल: कागदाचे कपटे वर्गातील कचऱ्याच्या डब्यात टाकणे, खाऊचे कागद इतरत्र न टाकता कचराकुंडीत टाकणे.
ऐ) कचराकुंडीतला कचरा उचलून नेलाच नाही, तर आपल्याला कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागेल?
कचराकुंडीतला कचरा उचलून नेलाच नाही, तर आपल्याला पुढील समस्यांना तोंड द्यावे लागेल: कचराकुंडीच्या ठिकाणी दुर्गंधी पसरेल, रोगराईचा धोका वाढेल.

प्रश्न ४: थोडक्यात उत्तरे लिहा

अ) रस्त्यावर कुत्री का भटकत असतील?
रस्त्यावर कुत्री भटकत असतील कारण त्यांना मालकांनी सोडून दिले असेल किंवा त्यांना पुरेसे अन्न आणि निवारा मिळत नसेल.
आ) रस्त्यावर सोडलेल्या कुत्र्यांचे मालक कोण असतील?
रस्त्यावर सोडलेल्या कुत्र्यांचे मालक काही व्यक्ती किंवा कुटुंबे असू शकतात, ज्यांनी त्यांना पाळण्याची जबाबदारी नाकारली.
इ) रस्त्यावर सोडलेली कुत्री काय खात असतील?
रस्त्यावर सोडलेली कुत्री कचऱ्यामधील अन्नाचे तुकडे, लोकांनी टाकलेले खाद्यपदार्थ किंवा रस्त्यावरील इतर टाकावू पदार्थ खात असतील.
ई) भटकी कुत्री अंगावर धावून का येतात?
भटकी कुत्री अंगावर धावून येतात कारण त्यांना भूक, भीती, किंवा त्यांच्या क्षेत्राचे रक्षण करण्याची प्रवृत्ती असते.
उ) भटकी कुत्री चावल्यास काय परिणाम होतील?
भटकी कुत्री चावल्यास रेबीजसारख्या जीवघेण्या रोगाचा धोका, जखम, आणि इतर संसर्ग होऊ शकतात.
ऊ) भटक्या कुत्र्यांची संख्या कशा प्रकारे कमी करता येईल?
भटक्या कुत्र्यांची संख्या कमी करण्यासाठी त्यांचे निर्बीजीकरण, लसीकरण, आणि पुनर्वसन कार्यक्रम राबवावेत.

आपल्या समस्या – आपले उपाय स्वाध्याय - pahavi marathi

इयत्ता पाचवी मराठी पाठ: आपल्या समस्या – आपले उपाय यामध्ये वाहतूक कोंडी, प्रदूषण, कचरा व्यवस्थापन, आणि भटक्या कुत्र्यांच्या समस्यांचे उपाय सांगितले आहेत. या स्वाध्यायात प्रश्नोत्तरे, योग्य पर्याय निवडणे, आणि उपाययोजना यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त मराठी अभ्यास साहित्य आणि पर्यावरण जागरूकता शिकण्याची संधी येथे उपलब्ध आहे. हा पाठ सामाजिक समस्यांवर उपाय शिकवतो.

कीवर्ड्स: आपल्या समस्या, आपले उपाय, स्वाध्याय, pahavi marathi, इयत्ता पाचवी मराठी, प्रश्नोत्तरे, मराठी अभ्यास, वाहतूक कोंडी, प्रदूषण, कचरा व्यवस्थापन

संबंधित स्वाध्याय: इयत्ता पाचवीच्या इतर मराठी पाठांचे स्वाध्याय शोधण्यासाठी:

Previous Post Next Post

نموذج الاتصال