इयत्ता पाचवी परिसर अभ्यास एक २०: आपले भावनिक जग स्वाध्याय प्रश्नोत्तरे
इयत्ता पाचवीच्या परिसर अभ्यास भाग १ मधील "आपले भावनिक जग" हा पाठ भावनिक समायोजन, रागाचे दुष्परिणाम, आणि समंजसपणा यांचे शैक्षणिक वर्णन करतो. या स्वाध्यायात प्रश्नोत्तरे, भावनांचे व्यवस्थापन, आणि वैयक्तिक विकास यांचा समावेश आहे, जे विद्यार्थ्यांना भावनिक जागरूकता वाढवण्यास मदत करते.
आपले भावनिक जग - प्रश्न १: रिकाम्या जागी योग्य शब्द
प्रश्न १: रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा
अ) माणूस विचारक्षम असतो, तसाच तो ................... असतो.
भावनाशील.
आ) आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये जे .............. गुण आहेत, त्यांचा प्रथम विचार करावा.
चांगले.
आपले भावनिक जग - प्रश्न २: एका वाक्यात उत्तरे
प्रश्न २: पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा
अ) व्यक्तिमत्त्व संतुलित कसे बनते?
भावनांचा योग्य मेळ घातल्यामुळे व्यक्तिमत्व संतुलित बनते.
आ) समंजसपणा व सहकार्याची वृत्ती कशामुळे कमी होते?
रागावर नियंत्रण न ठेवल्यामुळे समंजसपणा व सहकार्याची वृत्ती कमी होते.
इ) आपल्या स्वभावातील दोषांची जाणीव झाल्यानंतर आपण काय केले पाहिजे?
दोष दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
आपले भावनिक जग - प्रश्न ३: तीन-चार वाक्यांत उत्तरे
प्रश्न ३: पुढील प्रश्नांची तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा
अ) भावनिक समायोजन म्हणजे काय?
माणूस हा विचारक्षम असतो, तसाच तो भावनाशील असतो. आपले विचार आणि भावना यांचा योग्य मेळ घातला आला पाहिजे, त्या योग्य रीतीने व योग्य प्रमाणात व्यक्त करणे, यालाच ‘भावनिक समायोजन’ असे म्हणतात.
आ) रागाचे कोणते दुष्परिणाम होतात?
रागाने समंजसपणा व सहकार्याची वृत्ती कमी होते. आपण हट्टी होतो आणि इतरांचे मन दुखावतो. रागामुळे डोकेदुखी, निरुत्साह, आणि निद्रानाश होऊ शकतो.
ई) आपल्यातील उणिवांची जाणीव आपल्याला का असावी?
उणिवांची जाणीव असल्यास आपण त्यावर मात करू शकतो. उणिवांचा व्यक्तिमत्त्वावर परिणाम होतो, त्यामुळे जाणीव असणे आवश्यक आहे.
आपले भावनिक जग - प्रश्न ३: तुम्हाला काय वाटते?
प्रश्न ३: तुम्हाला काय वाटते ते लिहा
अ) तुमचे म्हणणे शिक्षक ऐकून घेत नाहीत.
मी निराश झालो, मला शिक्षकांचा रागही आला.
आ) घरातील निर्णय घेताना आईबाबा तुम्हाला विचारतात.
मला आनंद होतो.
इ) मित्राला मोठे बक्षीस मिळाले.
माझ्या मित्राला बक्षीस मिळाल्याचा मला अभिमान वाटेल.
ई) वर्गातील मुले तुमचे कौतुक करतात.
मला खूप आनंद होतो.
उ) रोहनने वर्गात तुमचा अपमान केला.
मला त्याचा राग येईल.
आपले भावनिक जग - प्रश्न ४: तुम्ही काय कराल?
प्रश्न ४: तुम्ही या प्रसंगी काय कराल?
अ) रोहिणीला निबंध स्पर्धेत पुरस्कार मिळाला.
रोहिणीचे अभिनंदन करेन आणि तिच्याकडून निबंध लेखनाची माहिती घेईन.
आ) कविताला राग आल्यामुळे तिने डबा खाल्ला नाही.
कविताच्या रागाचे कारण जाणून तिची समजूत काढेन आणि डबा खाण्यास सांगेन.
इ) वीणा शाळेत एकटी वावरते.
वीणाशी मैत्री करेन आणि तिला सर्वांसोबत सामावून घेईन.
ई) मकरंद म्हणतो, 'माझा स्वभावच हट्टी आहे'.
मकरंदला हट्टी स्वभावाचे तोटे सांगून तो बदलण्याचा सल्ला देईन.
आपले भावनिक जग - FAQ आणि शेअरिंग
FAQ आणि शेअरिंग
मुलांनो, हा स्वाध्याय तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. त्यांनाही अभ्यास करताना मदत होईल.
हा स्वाध्याय तुमच्या मित्रांसोबत WhatsApp, Facebook, किंवा ईमेलद्वारे शेअर करा. स्वाध्यायाची माहिती आवडल्यास खाली कमेंट करून सांगा!
स्वाध्यायाची माहिती आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा.
आपल्या अभिप्रायाने आम्हाला प्रोत्साहन मिळेल. खालील कमेंट विभागात आपले विचार लिहा!
इयत्ता पाचवी परिसर अभ्यास एक २०: आपले भावनिक जग स्वाध्याय प्रश्नोत्तरे
इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग १ चा पाठ: आपले भावनिक जग यामध्ये भावनिक समायोजन, रागाचे दुष्परिणाम, आणि समंजसपणा यांचे शैक्षणिक वर्णन आहे. या स्वाध्यायात प्रश्नोत्तरे, भावनांचे व्यवस्थापन, आणि वैयक्तिक विकास यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त मराठी अभ्यास साहित्य आणि भावनिक जागरूकता वाढवण्याची संधी येथे उपलब्ध आहे.
कीवर्ड्स: इयत्ता पाचवी परिसर अभ्यास, आपले भावनिक जग, स्वाध्याय प्रश्नोत्तरे, 5वी स्वाध्याय, मराठी अभ्यास, आपले भावनिक जग प्रश्न आणि उत्तरे, भावनिक समायोजन, राग, समंजसपणा
संबंधित स्वाध्याय: इयत्ता पाचवीच्या इतर परिसर अभ्यास पाठांचे स्वाध्याय शोधण्यासाठी:
FAQ: आपले भावनिक जग स्वाध्याय प्रश्नोत्तरे
१. आपले भावनिक जग स्वाध्याय कोणत्या विषयाचा आहे?
हा स्वाध्याय इयत्ता पाचवीच्या परिसर अभ्यास भाग १ या विषयाचा आहे, ज्यामध्ये भावनिक समायोजन आणि रागाचे दुष्परिणाम यांचे वर्णन आहे.
२. भावनिक समायोजन म्हणजे काय?
विचार आणि भावना यांचा योग्य मेळ घालून त्यांना योग्य रीतीने व्यक्त करणे म्हणजे भावनिक समायोजन.
३. रागाचे दुष्परिणाम काय होतात?
रागामुळे समंजसपणा कमी होतो, हट्टीपणा वाढतो, आणि डोकेदुखी, निद्रानाश होऊ शकतो.
४. उणिवांची जाणीव का असावी?
उणिवांची जाणीव असल्यास आपण त्यावर मात करून व्यक्तिमत्त्व सुधारू शकतो.