१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इयत्ता सातवी इतिहास आणि नागरिकशास्त्र धडा 6: मुघलांशी संघर्ष स्वाध्याय

इयत्ता सातवी इतिहास आणि नागरिकशास्त्र धडा सहावा: मुघलांशी संघर्ष स्वाध्याय

इयत्ता सातवी इतिहास आणि नागरिकशास्त्र धडा सहावा: मुघलांशी संघर्ष स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता सातवीच्या इतिहास आणि नागरिकशास्त्र विषयातील धडा सहावा "मुघलांशी संघर्ष" हा पाठ शिवाजी महाराजांचा मुघलांविरुद्धचा संघर्ष, त्यांचा राज्याभिषेक, आग्र्याहून सुटका, आणि दक्षिण मोहीम यांचे शैक्षणिक वर्णन करतो. या स्वाध्यायात प्रश्नोत्तरे, घटनांचा कालानुक्रम, आणि ऐतिहासिक विश्लेषण यांचा समावेश आहे, जे विद्यार्थ्यांना इतिहासाची जाणीव करून देण्यास मदत करते.

मुघलांशी संघर्ष - प्रश्न १: कालानुक्रमे लिहा

प्रश्न १: खालील घटना कालानुक्रमे लिहा

१) शिवाजी महाराजांची दक्षिण मोहीम
२) लाल महालावर छापा
३) आग्र्याहून सुटका
४) राज्याभिषेक
५) पुरंदरचा तह
६) शायिस्ताखानाची स्वारी
६) शायिस्ताखानाची स्वारी
२) लाल महालावर छापा
५) पुरंदरचा तह
३) आग्र्याहून सुटका
४) राज्याभिषेक
१) शिवाजी महाराजांची दक्षिण मोहीम

मुघलांशी संघर्ष - प्रश्न २: शोधा म्हणजे सापडेल

प्रश्न २: शोधा म्हणजे सापडेल

१) संस्कृत शब्द असणारा कोश
उत्तर: राज्यव्यवहारकोश
२) त्र्यंबकगड जिंकून घेणारा
उत्तर: मोरोपंत पिंगळे
३) वणी-दिंडोरी येथे पराभूत झालेला सरदार
उत्तर: दाउदखान
४) इंग्रज, डच, फ्रेंच यांच्या वखारी असलेले ठिकाण
उत्तर: सुरत

मुघलांशी संघर्ष - प्रश्न ३: तुमच्या शब्दांत लिहा

प्रश्न ३: तुमच्या शब्दांत लिहा

१) शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक
६ जून १६७४ या दिवशी विद्वान पंडित गागाभट्ट यांच्या हस्ते रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक मोठ्या थाटामाटात पार पडला. या राज्याभिषेकाद्वारे शिवाजी महाराज स्वराज्याचे छत्रपती झाले. आणि त्या दिवसापासून ‘राज्याभिषेक शक’ ही नवीन कालगणना सुरू करून छत्रपती शिवाजी महाराज शककर्ते राजे झाले. राज्याभिषेक प्रसंगी शिवाजी महाराजांनी सोन्याचा ‘होन’ व तांब्याची ‘शिवराई’ ही खास नाणी पाडली. आणि या नाण्यावर ‘श्री राजा शिवछत्रपती’ अशी अक्षरे कोरण्यात आली. तेथूनच पुढे राजपत्रांवर ‘क्षत्रियकुलावतंस श्री राजा शिवछत्रपती’ असा उल्लेख होऊ लागला.
२) आग्र्याहून सुटका
१) शिवाजी महाराज जयसिंगराजावर विश्वास ठेऊन औरंगजेब बादशहाच्या भेटीला आग्र्याला गेले.
२) बादशहाने तेथे त्यांना नजरकैदेत ठेवले. नजरकैदेतून सुटका करून घेण्यासाठी त्यांनी योजना आखली आणि ते आग्र्याहून शिताफीने निसटले.
३) आग्र्याहून येताना संभाजी राजांना त्यांनी मथुरा येथे ठेवले. पुढे त्यांनाही सुखरूपपणे महाराष्ट्रात आणण्यात आले.
३) शिवाजी महाराजांची दक्षिणेची मोहीम
१) ऑक्टोबर १६७७ मध्ये महाराजांनी दक्षिणेची मोहीम हाती घेतली.
२) गोवळकोंड्याला त्यांनी कुतुबशहाशी मैत्रीचा तह केला.
३) पुढे महाराजांनी कर्नाटकातील बंगळूरू, होसकोटे, तसेच सध्याचा तमिळनाडू मधील जिंजी वेल्लोर इत्यादी किल्ले आणि आदिलशाहीचा इतर भाग जिंकून घेतला.
४) या मोहिमेदरम्यान फौजेने तेथील प्रजेला कोणताही त्रास दिला नाही.
४) शिवरायांनी राज्याभिषेकासाठी केलेली तयारी
१) शिवरायांच्या राज्याभिषेकाची तयारी जवळपास दोन ते तीन वर्षांपासूनच सुरू होती.
२) शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी अत्यंत मोल्यवान व भव्य सिंहासन बनवण्यात आले.
३) राज्याभिषेकावेळी निरनिराळ्या प्रांतातून जे श्रेष्ठ विद्वान होते ते आले होते.
४) सोन्याची व तांब्याची खास नाणी पाडण्यात आली ज्यावर राजा शिवछत्रपती अशी अक्षरे कोरण्यात आली होती.
५) पौरोहित्य करण्यासाठी विद्वान पंडित गागाभट्ट यांना बोलावण्यात आले होते.

मुघलांशी संघर्ष - प्रश्न ४: कारणे लिहा

प्रश्न ४: कारणे लिहा

१) शिवरायांनी पुरंदरचा तह केला.
१) शिवाजी महाराजांकडून किल्ले जिंकून घेण्यासाठी विविध भागांत मुघल बादशाहाने सैनिकांच्या तुकड्या पाठवल्या.
२) त्या सैन्याने स्वराज्यातील भूप्रदेशाची मोठी हानी केली.
३) मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेरखानाने पुरंदर किल्ल्यास वेढा दिला. पुरंदरच्या वेढ्याच्या वेळी मुरारबाजी देशपांडे याने आपल्या पराक्रमाची शर्थ केली, परंतु त्याला वीरमरण आले.
४) परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शिवरायांनी जयसिंगासोबत पुरंदरचा तह केला.
२) शिवाजी महाराजांनी मुघलांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला.
१) मुघल सैन्याने आक्रमण करून स्वराज्यातील भूप्रदेशाची मोठी हानी केली होती.
२) पुरंदरच्या तहात मुघलांना दिलेले किल्ले आणि प्रदेश परत मिळवणे हे महाराजांचे उद्दिष्ट होते.
३) हे किल्ले व भूप्रदेश मुघलांकडून परत मिळविण्यासाठी शिवाजी महाराजांनी मुघलांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला.

FAQ आणि शेअरिंग

FAQ आणि शेअरिंग

मुलांनो, हा स्वाध्याय तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. त्यांनाही अभ्यास करताना मदत होईल.
हा स्वाध्याय तुमच्या मित्रांसोबत WhatsApp, Facebook, किंवा ईमेलद्वारे शेअर करा. स्वाध्यायाची माहिती आवडल्यास खाली कमेंट करून सांगा!
स्वाध्यायाची माहिती आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा.
आपल्या अभिप्रायाने आम्हाला प्रोत्साहन मिळेल. खालील कमेंट विभागात आपले विचार लिहा!

इयत्ता सातवी इतिहास आणि नागरिकशास्त्र धडा सहावा: मुघलांशी संघर्ष स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता सातवी इतिहास आणि नागरिकशास्त्र विषयाचा धडा सहावा: मुघलांशी संघर्ष यामध्ये शिवाजी महाराजांचा मुघलांविरुद्धचा संघर्ष, त्यांचा राज्याभिषेक, आग्र्याहून सुटका, आणि दक्षिण मोहीम यांचे शैक्षणिक वर्णन आहे. या स्वाध्यायात प्रश्नोत्तरे, घटनांचा कालानुक्रम, आणि ऐतिहासिक विश्लेषण यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त इतिहास अभ्यास साहित्य आणि इतिहासाची जाणीव करून देण्याची संधी येथे उपलब्ध आहे. Iyatta Satavi Itihas Swadhay PDF आणि गाइड डाउनलोड करा.

कीवर्ड्स: इयत्ता सातवी इतिहास स्वाध्याय, मुघलांशी संघर्ष, धडा सहावा स्वाध्याय, 7वी इतिहास स्वाध्याय, इतिहास अभ्यास, मुघलांशी संघर्ष प्रश्न आणि उत्तरे, Iyatta Satavi Itihas Swadhay, Iyatta Satavi Itihas guide, स्वाध्याय PDF, Shivaji Maharaj, Mughal conflict, Maratha history

संबंधित स्वाध्याय: इयत्ता सातवीच्या इतर इतिहास आणि नागरिकशास्त्र अभ्यास पाठांचे स्वाध्याय शोधण्यासाठी:

Previous Post Next Post

نموذج الاتصال