१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इयत्ता सातवी इतिहास आणि नागरिकशास्त्र धडा 4:शिवपूर्वकालीन महाराष्ट्र स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता सातवी इतिहास आणि नागरिकशास्त्र धडा चौथा: शिवपूर्वकालीन महाराष्ट्र स्वाध्याय

इयत्ता सातवी इतिहास आणि नागरिकशास्त्र धडा चौथा: शिवपूर्वकालीन महाराष्ट्र स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता सातवीच्या इतिहास आणि नागरिकशास्त्र विषयातील धडा चौथा "शिवपूर्वकालीन महाराष्ट्र" हा पाठ मध्ययुगीन महाराष्ट्रातील सामाजिक, धार्मिक आणि प्रशासकीय व्यवस्था तसेच संतांचे योगदान यांचे शैक्षणिक वर्णन करतो. या स्वाध्यायात प्रश्नोत्तरे, तक्ते, आणि संतांचे कार्य यांचा समावेश आहे, जे विद्यार्थ्यांना इतिहासाची जाणीव करून देण्यास मदत करते.

शिवपूर्वकालीन महाराष्ट्र - प्रश्न १: तक्ता पूर्ण करा

प्रश्न १: खालील तक्ता पूर्ण करा

गाव/मौजा कसबा परगणा
कशास म्हणतात छोट्या गावाला मौजा असेही म्हणत. मोठ्या खेड्यास कसबा म्हणत. सामान्यतः ते परगण्याचे मुख्य ठिकाण असे. अनेक गावे मिळून परगणा होतो.
पदाधिकारी गावचा प्रमुख पाटील, महसुलाची नोंद कुलकर्णी ठेवत असत. शेटे व महाजन हे वतनदार कारभारी होते. देशपांडे व देशमुख हे वतनदार अधिकारी होते.
उदाहरण वाई कसब्यातील छोटेसे गाव वाई कसबा, इंदापूर कसबा पुणे किंवा चाकण परगणा

शिवपूर्वकालीन महाराष्ट्र - प्रश्न २: म्हणजे काय?

प्रश्न २: म्हणजे काय?

१) बुद्रुक
मूळ गावाला ‘बुद्रुक’ असे म्हणतात.
२) बलुतं
गावात कारागीर जी सेवा देत असत, त्याबद्दल शेतकऱ्यांकडून त्यांना शेतीतील उत्पन्नाचा काही वाटा मिळे. त्यास बलुतं असे म्हणत.
३) वतन
वंशपरंपरेने आणि कायमस्वरूपी उपभोगण्यास दिलेली सरमुक्त जमीन म्हणजे वतन होय.

शिवपूर्वकालीन महाराष्ट्र - प्रश्न ३: शोधून लिहा

प्रश्न ३: शोधून लिहा

१) कोकण किनारपट्टीवर आफ्रिकेतून आलेले लोक
सिद्दी लोक
२) अमृतानुभव ग्रंथाचे रचनाकार
संत ज्ञानेश्वर
३) संत तुकारामांचे गाव
देहू
४) भारुडाचे रचनाकार
संत एकनाथ
५) बालोपासनेचे महत्त्व सांगणारे
रामदास स्वामी
६) स्त्री संतांची नावे
संत जनाबाई, संत निर्मळाबाई, संत सोयराबाई, संत मुक्ताबाई, संत बहिणाबाई

शिवपूर्वकालीन महाराष्ट्र - प्रश्न ४: माहिती व कार्ये लिहा

प्रश्न ४: तुमच्या शब्दांत माहिती व कार्ये लिहा

१) संत नामदेव
१) संत नामदेव वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ संत होते.
२) ते कुशल संघटक होते. ते उत्तम कीर्तनकारही होते.
३) कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी सर्व जाती-जमातींमधील स्त्री-पुरुषांना एकत्र करून त्यांच्यात समतेची भावना जागवली.
४) ‘नाचू कीर्तनाचे रंगी। ज्ञानदीप लावू जगी।।’ ही त्यांची प्रतिज्ञा होती.
५) अनेक संतांवर आणि सर्वसामान्य लोकांवर त्यांच्या शिकवणुकीचा प्रभाव पडला.
६) त्यांनी भागवत धर्माचा संदेश गावोगावी पोचवण्याचे कार्य केले.
७) त्यांनी पंढरपूर येथे विठ्ठलाच्या महाद्वारासमोर संत चोखामेळा यांची समाधी बांधली.
२) संत ज्ञानेश्वर
१) हे वारकरी संप्रदायातील एक विख्यात संत होते.
२) त्यांनी ‘भगवद्गीता’ या संस्कृत ग्रंथाचा अर्थ मराठीत स्पष्ट करणारा ‘भावार्थदीपिका’ अर्थात ‘ज्ञानेश्वरी’ हा ग्रंथ रचला.
३) संत ज्ञानेश्वरांनी ‘अमृतानुभव’ या ग्रंथाची रचना केली. त्यांनी आपल्या ग्रंथांतून व अभंगांतून भक्तिमार्गाचे महत्त्व सांगितले.
४) सामान्यांना आचरता येईल, असा आचारधर्म सांगितला.
५) वारकरी संप्रदायाला धर्माची प्रतिष्ठा मिळवून दिली.
३) संत एकनाथ
१) हे महाराष्ट्राच्या भक्ती चळवळीतील एक महान संत होते.
२) त्यांचे साहित्य विपुल व विविध प्रकारचे आहे. त्यात अभंग, गौळणी, भारुडे इत्यादींचा समावेश होतो.
३) त्यांनी भागवत धर्माची मांडणी सोपी व सविस्तर केलेली आहे. भावार्थ रामायणात रामकथेच्या निमित्ताने लोकजीवनाचे चित्र रेखाटले आहे.
४) त्यांनी भागवत या संस्कृत ग्रंथाच्या भक्तीविषयक भागाचा अर्थ मराठीत विशद केला.
५) परमार्थप्राप्तीसाठी प्रपंच सोडण्याची आवश्यकता नाही, हे त्यांनी स्वतःच्या आचरणाने दाखवून दिले.
६) ते खऱ्या अर्थाने लोकशिक्षक होते.
७) आपली मराठी भाषा कोणत्याही भाषेपेक्षा कमी नाही असे ते मानत.
४) संत तुकाराम
१) हे पुण्याजवळील देहू गावचे. त्यांची अभंगरचना प्रसन्न आणि प्रासादिक आहे.
२) त्यांच्या अभंगांना श्रेष्ठ कवित्वाची उंची लाभली आहे.
३) संत तुकारामांची ‘गाथा’ ही मराठी भाषेचा अमोल ठेवा आहे.
४) संत तुकाराम रंजल्यागांजल्यांमध्ये देवत्व पाहण्यास सांगतात.
५) त्यांनी आपल्याकडे असलेली लोकांना दिलेल्या कर्जांची कागदपत्रे इंद्रायणीच्या डोहात बुडवून कित्येक कुटुंबांना कर्जमुक्त केले.

शिवपूर्वकालीन महाराष्ट्र - प्रश्न ५: दुष्काळाचे संकट

प्रश्न ५: दुष्काळ हे रयतेला मोठे संकट का वाटत होते?

१) शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असे.
२) पाऊस पडला नाही तर शेतात पीक येत नसे. मग अन्नधान्याचे भाव वाढत. लोकांना अन्नधान्य मिळणे मुश्कील होई.
३) जनावरांना चारा मिळत नसे. पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होई.
४) लोकांना गावात राहणे कठीण होई. लोक गाव सोडत. लोकांवर परागंदा होण्याची वेळ येई. म्हणून रयतेला दुष्काळ हे सर्वांत मोठे संकट वाटत असे.

FAQ आणि शेअरिंग

FAQ आणि शेअरिंग

मुलांनो, हा स्वाध्याय तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. त्यांनाही अभ्यास करताना मदत होईल.
हा स्वाध्याय तुमच्या मित्रांसोबत WhatsApp, Facebook, किंवा ईमेलद्वारे शेअर करा. स्वाध्यायाची माहिती आवडल्यास खाली कमेंट करून सांगा!
स्वाध्यायाची माहिती आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा.
आपल्या अभिप्रायाने आम्हाला प्रोत्साहन मिळेल. खालील कमेंट विभागात आपले विचार लिहा!

इयत्ता सातवी इतिहास आणि नागरिकशास्त्र धडा चौथा: शिवपूर्वकालीन महाराष्ट्र स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता सातवी इतिहास आणि नागरिकशास्त्र विषयाचा धडा चौथा: शिवपूर्वकालीन महाराष्ट्र यामध्ये मध्ययुगीन महाराष्ट्रातील सामाजिक, धार्मिक आणि प्रशासकीय व्यवस्था तसेच संतांचे योगदान यांचे शैक्षणिक वर्णन आहे. या स्वाध्यायात प्रश्नोत्तरे, तक्ते, आणि संतांचे कार्य यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त इतिहास अभ्यास साहित्य आणि इतिहासाची जाणीव करून देण्याची संधी येथे उपलब्ध आहे. Iyatta Satavi Itihas Swadhay PDF आणि गाइड डाउनलोड करा.

कीवर्ड्स: इयत्ता सातवी इतिहास स्वाध्याय, शिवपूर्वकालीन महाराष्ट्र, धडा चौथा स्वाध्याय, 7वी इतिहास स्वाध्याय, इतिहास अभ्यास, शिवपूर्वकालीन महाराष्ट्र प्रश्न आणि उत्तरे, Iyatta Satavi Itihas Swadhay, Iyatta Satavi Itihas guide, स्वाध्याय PDF

संबंधित स्वाध्याय: इयत्ता सातवीच्या इतर इतिहास आणि नागरिकशास्त्र अभ्यास पाठांचे स्वाध्याय शोधण्यासाठी:

Previous Post Next Post

نموذج الاتصال