१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इयत्ता सातवी इतिहास आणि नागरिकशास्त्र धडा 2:शिवपूर्वकालीन भारत स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता सातवी इतिहास आणि नागरिकशास्त्र धडा दुसरा: शिवपूर्वकालीन भारत स्वाध्याय

इयत्ता सातवी इतिहास आणि नागरिकशास्त्र धडा दुसरा: शिवपूर्वकालीन भारत स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता सातवीच्या इतिहास आणि नागरिकशास्त्र विषयातील धडा दुसरा "शिवपूर्वकालीन भारत" हा पाठ भारतातील मध्ययुगीन इतिहास, राज्ये, आणि प्रमुख व्यक्तींचे शैक्षणिक वर्णन करतो. या स्वाध्यायात प्रश्नोत्तरे, संकल्पना स्पष्टीकरण, आणि ऐतिहासिक घटनांचे विश्लेषण यांचा समावेश आहे, जे विद्यार्थ्यांना इतिहासाची जाणीव करून देण्यास मदत करते.

शिवपूर्वकालीन भारत - प्रश्न १: नावे सांगा

प्रश्न १: नावे सांगा

१) गोंडवनची राणी
उत्तर: राणी दुर्गावती
२) उदयसिंहाचा पुत्र
उत्तर: महाराणा प्रताप
३) मुघल सत्तेचा संस्थापक
उत्तर: बाबर
४) बहमनी राज्याचा पहिला सुलतान
उत्तर: हसन गंगू
५) गुरुगोविंदसिंग यांनी स्थापन केलेले दल
उत्तर: खालसा दल

शिवपूर्वकालीन भारत - प्रश्न २: गटात न बसणारा पर्याय निवडा

प्रश्न २: गटात न बसणारा पर्याय निवडा

१) सुलतान मुहम्मद, कुतुबुद्दीन ऐबक, मुहम्मद घोरी, बाबर
उत्तर: बाबर
२) आदिलशाही, निजामशाही, सुलतानशाही, बरिदशाही
उत्तर: सुलतानशाही
३) अकबर, हुमायून, शेरशाह, औरंगजेब
उत्तर: शेरशाह

शिवपूर्वकालीन भारत - प्रश्न ३: थोडक्यात उत्तरे लिहा

प्रश्न ३: थोडक्यात उत्तरे लिहा

१) विजयनगर व बहमनी ही दोन राज्ये का उदयास आली?
१) दिल्लीचा सुलतान मुहम्मद तुघलक याच्या कारकिर्दीत दिल्लीच्या मध्यवर्ती सत्तेविरुद्ध अनेक उठाव झाले.
२) या अस्थिरतेचा फायदा घेऊन हरिहर व बुक्क यांनी इ.स. १३३६ मध्ये विजयनगरचे राज्य स्थापन केले.
३) हसन गंगू याने दिल्लीच्या सुलतानाच्या सैन्याचा पराभव केला व इ.स. १३४७ मध्ये नवीन राज्य बहमनी राज्य अस्तित्वात आले.
२) महमूद गावानने कोणत्या सुधारणा केल्या?
महमूद गावानने पुढील सुधारणा केल्या:
१) राज्यास आर्थिक सामर्थ्य प्राप्त करून दिले.
२) सैनिकांना जहागिरी देण्याऐवजी रोख पगार देण्यास सुरुवात केली.
३) सैन्यामध्ये शिस्त आणली.
४) जमिन महसूल व्यवस्थेत सुधारणा केली.
५) बिदर येथे फारसी विद्यांच्या अभ्यासासाठी मदरसा स्थापन केली.
३) मुघलांना आसाममध्ये आपली सत्ता दृढ करणे का अशक्य झाले?
१) औरंगजेबाच्या सैन्याने आसाममधील आहोमांच्या प्रदेशावर आक्रमण केले.
२) गदाधरसिंह याच्या नेतृत्वाखाली आहोम संघटित झाले आणि त्यांनी मुघलांविरुद्ध संघर्ष केला.
३) आहोमांनी मुघलांविरुद्धच्या संघर्षात गनिमी युद्धतंत्राचा अवलंब केला. त्यामुळे मुघलांना आसाममध्ये आपली सत्ता दृढ करणे अशक्य झाले.

शिवपूर्वकालीन भारत - प्रश्न ४: तुमच्या शब्दांत माहिती लिहा

प्रश्न ४: तुमच्या शब्दांत थोडक्यात माहिती लिहा

१) कृष्णदेवराय
१) कृष्णदेवराय इ.स. १५०९ मध्ये विजयनगरच्या गादीवर आले. त्यांनी विजयवाडा आणि राजमहेंद्रवरी हे प्रदेश जिंकून घेऊन आपल्या राज्याचा विस्तार केला.
२) बहमनी सुलतान महमूदशाह याच्या नेतृत्वाखाली एकत्रित आलेल्या सुलतानांच्या सैन्यसंघाचा त्याने पराभव केला.
३) कृष्णदेवराय हा विद्वान होता. त्याने तेलुगु भाषेमध्ये आमुक्तमाल्यदा हा राजनितीविषयक ग्रंथ लिहिला.
४) कृष्णदेवराय यांच्या कारकिर्दीतच विजयनगरमध्ये हजार राम मंदिर, विठ्ठल मंदिराचे बांधकाम झाले.
२) चांदबिबी
१) अहमदनगरच्या हुसेन निजामशाहची कर्तबगार मुलगी चांदबिबी होय.
२) इ.स. १५९५ मध्ये मुघलांनी अहमदनगर या निजामशाहीच्या राजधानीवर हल्ला केला.
३) मुघल सैन्याने अहमदनगरच्या किल्ल्याला वेढा दिला. हा किल्ला चांदबिबीने धैर्याने लढवला.
४) या वेळी निजामशाहीतील सरदारांमध्ये दुही निर्माण झाली आणि या दुहीतून चांदबिबीस ठार मारले गेले; यामुळे मुघलांना किल्ला जिंकता आला नाही.
३) राणी दुर्गावती
१) चंदेल राजपुतांच्या घराण्यात जन्मलेली दुर्गावती ही गोंडवनची राणी झाली.
२) तिने उत्तम रीतीने राज्यकारभार केला.
३) तिने मुघलांविरुद्ध दिलेल्या लढा महत्त्वाचा मानला जातो.
४) अकबराविरुद्ध लढताना दुर्गावतीने पतीच्या मृत्यूनंतरही शरणागती पत्करली नाही. अकबराविरुद्ध लढताना प्राणार्पण केले.

शिवपूर्वकालीन भारत - प्रश्न ५: सकारण लिहा

प्रश्न ५: सकारण लिहा

१) बहमनी राज्याची पाच शकले झाली.
१) महमूद गावानंतर बहमनी सरदारांमध्ये गटबाजी वाढीस लागली.
२) विजयनगर व बहमनी यांच्यातील संघर्षाचा बहमनी राज्यावर प्रतिकूल परिणाम होऊन हे राज्य कमकुवत झाले.
३) विविध प्रांतांतील अधिकारी अधिक स्वतंत्र वृत्तीने वागू लागले. बहमनी राज्याचे राज्यकर्ते यावर नियंत्रण न ठेवू शकल्यामुळे बहमनी राज्याची पाच शकले झाली.
२) राणासंगाच्या सैन्याचा पराभव झाला.
१) पानिपतच्या पहिल्या लढाईनंतर मेवाडच्या राणासंगाने राजपूत राजांना एकत्र आणले.
२) बाबर आणि राणासंग यांच्यामध्ये खानुआ या ठिकाणी लढाई झाली.
३) बाबराच्या तोफखान्यापुढे राणासंगाच्या सैन्याचा टिकाव लागला नाही.
४) बाबराच्या राखीव सैन्याने प्रभावी कामगिरी केली. यामुळे राणासंगाच्या सैन्याचा पराभव झाला.
३) राणा प्रताप इतिहासात अजरामर झाले.
१) अकबराने संपूर्ण भारत स्वतःच्या एकछत्री अमलाखाली आणण्याच्या प्रयत्न केला.
२) मेवाडच्या गादीवर असलेले राणा प्रताप यांनी याला विरोध केला.
३) त्यांनी मेवाडच्या अस्तित्वासाठी संघर्ष चालू ठेवला.
४) महाराणा प्रताप यांनी अखेरपर्यंत आपले स्वातंत्र्य टिकवण्यासाठी अकबराबरोबर संघर्ष केला.
५) पराक्रम, धैर्य, स्वाभिमान, त्याग इत्यादी गुणांमुळे ते इतिहासात अजरामर झाले.
४) औरंगजेबाने गुरुतेघबहाद्दर यांना कैद केले.
१) औरंगजेबाने वर्चस्ववादी धोरणातून आपल्या साम्राज्याचा विस्तार केला.
२) त्यांचे धार्मिक धोरणही असहिष्णू होते. या असहिष्णू धार्मिक धोरणाविरुद्ध शिखांचे नववे गुरु गुरुतेघबहाद्दर यांनी तीव्र नापसंती दर्शवली. त्यामुळे औरंगजेबाने गुरुतेघबहाद्दर यांना कैद केले.
५) राजपुतांनी मुघलांविरुद्ध संघर्ष केला.
१) अकबराने आपल्या सलोख्याच्या धोरणाने राजपुतांचे सहकार्य मिळवले होते. मात्र औरंगजेबाला राजपुतांचे सहकार्य मिळवता आले नाही.
२) मारवाडचा राणा जसवंतसिंग याच्या मृत्यूनंतर त्याचे राज्य औरंगजेबाने मुघल साम्राज्यास जोडून घेतले.
३) दुर्गादास राठोड याने जसवंतसिंगाचा अल्पवयीन मुलगा अजितसिंह याला मारवाडच्या गादीवर बसवले. दुर्गादास राठोडने मुघलांविरुद्ध मोठा संघर्ष केला.
४) दुर्गादास राठोड याने मारवाडच्या अस्तित्वासाठी मुघलांविरुद्ध संघर्ष केला.

शिवपूर्वकालीन भारत - प्रश्न ७: माहिती लिहा

प्रश्न ७: इंटरनेटच्या साहाय्याने तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही एका व्यक्तीची माहिती मिळवा व खालील चौकटीत लिहा

मला हे माहित आहे:
· चंदेल राजपुतांच्या घराण्यात जन्मलेली दुर्गावती ही गोंडवनची राणी झाली.
· तिने उत्तम रीतीने राज्यकारभार केला.
· तिने मुघलांविरुद्ध दिलेल्या लढा महत्त्वाचा मानला जातो.
· अकबराविरुद्ध लढताना दुर्गावतीने पतीच्या मृत्यूनंतरही शरणागती पत्करली नाही. अकबराविरुद्ध लढताना प्राणार्पण केले.

FAQ आणि शेअरिंग

FAQ आणि शेअरिंग

मुलांनो, हा स्वाध्याय तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. त्यांनाही अभ्यास करताना मदत होईल.
हा स्वाध्याय तुमच्या मित्रांसोबत WhatsApp, Facebook, किंवा ईमेलद्वारे शेअर करा. स्वाध्यायाची माहिती आवडल्यास खाली कमेंट करून सांगा!
स्वाध्यायाची माहिती आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा.
आपल्या अभिप्रायाने आम्हाला प्रोत्साहन मिळेल. खालील कमेंट विभागात आपले विचार लिहा!

इयत्ता सातवी इतिहास आणि नागरिकशास्त्र धडा दुसरा: शिवपूर्वकालीन भारत स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता सातवी इतिहास आणि नागरिकशास्त्र विषयाचा धडा दुसरा: शिवपूर्वकालीन भारत यामध्ये मध्ययुगीन भारतातील राज्ये, प्रमुख व्यक्ती, आणि ऐतिहासिक घटनांचे शैक्षणिक वर्णन आहे. या स्वाध्यायात प्रश्नोत्तरे, संकल्पना स्पष्टीकरण, आणि ऐतिहासिक विश्लेषण यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त इतिहास अभ्यास साहित्य आणि इतिहासाची जाणीव करून देण्याची संधी येथे उपलब्ध आहे. Iyatta Satavi Itihas Swadhay PDF आणि गाइड डाउनलोड करा.

कीवर्ड्स: इयत्ता सातवी इतिहास स्वाध्याय, शिवपूर्वकालीन भारत, धडा दुसरा स्वाध्याय, 7वी इतिहास स्वाध्याय, इतिहास अभ्यास, शिवपूर्वकालीन भारत प्रश्न आणि उत्तरे, Iyatta Satavi Itihas Swadhay, Iyatta Satavi Itihas guide, स्वाध्याय PDF

संबंधित स्वाध्याय: इयत्ता सातवीच्या इतर इतिहास आणि नागरिकशास्त्र अभ्यास पाठांचे स्वाध्याय शोधण्यासाठी:

Previous Post Next Post

نموذج الاتصال