१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी
test

इयत्ता सातवी इतिहास आणि नागरिकशास्त्र धडा 5:स्वराज्यस्थापना स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता सातवी इतिहास आणि नागरिकशास्त्र धडा पाचवा: स्वराज्यस्थापना स्वाध्याय

इयत्ता सातवी इतिहास आणि नागरिकशास्त्र धडा पाचवा: स्वराज्यस्थापना स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता सातवीच्या इतिहास आणि नागरिकशास्त्र विषयातील धडा पाचवा "स्वराज्यस्थापना" हा पाठ शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात कशी केली, त्यांचे सहकारी, आणि त्यांच्या ध्येयाचे शैक्षणिक वर्णन करतो. या स्वाध्यायात प्रश्नोत्तरे, तक्ते, आणि ऐतिहासिक घटनांचे विश्लेषण यांचा समावेश आहे, जे विद्यार्थ्यांना इतिहासाची जाणीव करून देण्यास मदत करते.

स्वराज्यस्थापना - प्रश्न १: गटात न बसणारा शब्द शोधा

प्रश्न १: गटात न बसणारा शब्द शोधा

१) पुणे, सुपे, चाकण, बंगळूरू
उत्तर: बंगळूरू
२) फलटणचे जाधव, जावळीचे मोरे, मुधोळचे घोरपडे, सावंतवाडीचे सावंत
उत्तर: फलटणचे जाधव
३) तोरणा, मुरुंबदेव, सिंहगड, सिंधुदुर्ग
उत्तर: सिंधुदुर्ग

स्वराज्यस्थापना - प्रश्न २: लिहिते होऊया

प्रश्न २: चला, लिहिते होऊया!

१) शिवाजी महाराजांवर वीरमाता जिजाबाईंनी केलेले विविध संस्कार लिहा.
शिवाजी महाराजांवर वीरमाता जिजाबाईंनी शील, सत्यप्रियता, वाक्चातुर्य, दक्षता, धैर्य, निर्भयता, शस्त्रप्रयोग, विजयाकांक्षा, स्वराज्यस्वप्न यांसारखे विविध संस्कार केले.
२) शिवाजी महाराजांनी स्वराज्यस्थापनेची सुरुवात मावळ भागातून केली.
१) मावळ म्हणजे सध्याच्या पुणे जिल्ह्याचा पश्चिम व नैऋत्य दिशांचा भाग होय.
२) मावळचा प्रदेश डोंगराळ, दऱ्याखोऱ्यांचा व दुर्गम.
३) मावळच्या या भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेऊन शिवजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात मावळ भागातून केली.

स्वराज्यस्थापना - प्रश्न ३: सहकारी यादी

प्रश्न ३: शिवाजी महाराजांचे सवंगडी व सहकारी यांची यादी करा

१) येसाजी कंक
२) बाजी पासलकर
३) बापूजी मुदगल
४) नऱ्हेकर देशपांडे बंधू
५) कावजी कोंढाळकर
६) जिवा महाला
७) तानाजी मालुसरे
८) कान्होजी जेधे
९) बाजीप्रभू देशपांडे
१०) दादाजी नरसप्रभू देशपांडे

स्वराज्यस्थापना - प्रश्न ४: शोधा आणि लिहा

प्रश्न ४: शोधा आणि लिहा

१) शहाजीराजांना स्वराज्य संकल्पक का म्हणतात?
१) शहाजीराजे पराक्रमी, धैर्यशील, बुद्धिमान आणि श्रेष्ठ राजनीतिज्ञ होते.
२) दक्षिण भारतात त्यांचा मोठा दरारा होता.
३) परकीय लोकांच्या सत्ता उलथवून स्वराज्य स्थापन करावे, ही त्यांची स्वतःची तीव्र आकांक्षा होती.
४) त्यांनी शिवरायांना राजा बनण्यासाठी योग्य असे उत्तम शिक्षण देण्याची व्यवस्था केली होती. म्हणूनच त्यांना स्वराज्य संकल्पक म्हटले जाते.
२) शिवरायांनी आरमार उभारणीकडे लक्ष का दिले?
१) शिवाजी महाराजांनी यानंतर कल्याण व भिवंडी ही ठिकाणे जिंकून घेतली.
२) त्यामुळे पश्चिम किनारपट्टीवरील सिद्दी, पोर्तुगीज व इंग्रज या सत्तांशी त्यांचा संबंध आला.
३) या सत्तांशी संघर्ष करायचा असेल, तर आपल्याला प्रबळ असे आरमार उभारले पाहिजे, हे शिवरायांच्या लक्षात आले. त्यामुळे शिवरायांनी आरमार उभारणीकडे लक्ष दिले.
३) शिवरायांनी आदिल शाहाबरोबर तह का केला?
१) शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशाहाने पाठवलेल्या सिद्दी जौहरने पन्हाळगडाला वेढा घातला होता.
२) त्याच वेळी दिल्लीच्या तख्तावर आलेल्या औरंगजेब बादशाहाने मुघल सरदार शायिस्ताखान यास दक्षिणेत पाठवले.
३) शायिस्ताखानाने पुणे प्रांतावर स्वारी केलेली होती.
४) त्या वेळी शिवाजी महाराजांचा आदिलशाहीशीही संघर्ष चालू होता.
५) अशा परिस्थितीत, दोन शत्रूंबरोबर एकाच वेळी लढणे, ही गोष्ट बरोबर होणार नाही, हे शिवाजी महाराजांनी लक्षात घेतले. म्हणून शिवरायांनी आदिल शाहाबरोबर तह केला.
४) शिवाजी महाराज पन्हाळगडावरून कसे निसटले?
१) सिद्दी पन्हाळ्याचा वेढा उठवेल, अशी चिन्हे दिसत नव्हती. म्हणून महाराजांनी सिद्दीशी बोलणी सुरू केली.
२) त्यामुळे सिद्दीने पन्हाळगडास दिलेल्या वेढ्यामध्ये शिथिलता निर्माण झाली. या शिथिलतेचा फायदा महाराजांना झाला.
३) त्यांच्यासारखा दिसणारा शिवा काशिद हा तरुण महाराजांची वेशभूषा करून पालखीत बसला. पालखी राजदिंडी दरवाज्यातून बाहेर पडली.
४) त्याचवेळी शिवाजी महाराज दुसऱ्या अवघड वाटेने गडाबाहेर पडले.

FAQ आणि शेअरिंग

FAQ आणि शेअरिंग

मुलांनो, हा स्वाध्याय तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. त्यांनाही अभ्यास करताना मदत होईल.
हा स्वाध्याय तुमच्या मित्रांसोबत WhatsApp, Facebook, किंवा ईमेलद्वारे शेअर करा. स्वाध्यायाची माहिती आवडल्यास खाली कमेंट करून सांगा!
स्वाध्यायाची माहिती आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा.
आपल्या अभिप्रायाने आम्हाला प्रोत्साहन मिळेल. खालील कमेंट विभागात आपले विचार लिहा!

इयत्ता सातवी इतिहास आणि नागरिकशास्त्र धडा पाचवा: स्वराज्यस्थापना स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता सातवी इतिहास आणि नागरिकशास्त्र विषयाचा धडा पाचवा: स्वराज्यस्थापना यामध्ये शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात कशी केली, त्यांचे सहकारी आणि त्यांच्या ध्येयाचे शैक्षणिक वर्णन आहे. या स्वाध्यायात प्रश्नोत्तरे, तक्ते, आणि ऐतिहासिक विश्लेषण यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त इतिहास अभ्यास साहित्य आणि इतिहासाची जाणीव करून देण्याची संधी येथे उपलब्ध आहे. Iyatta Satavi Itihas Swadhay PDF आणि गाइड डाउनलोड करा.

कीवर्ड्स: इयत्ता सातवी इतिहास स्वाध्याय, स्वराज्यस्थापना, धडा पाचवा स्वाध्याय, 7वी इतिहास स्वाध्याय, इतिहास अभ्यास, स्वराज्यस्थापना प्रश्न आणि उत्तरे, Iyatta Satavi Itihas Swadhay, Iyatta Satavi Itihas guide, स्वाध्याय PDF, Shivaji Maharaj, Maratha empire, Swarajya establishment

संबंधित स्वाध्याय: इयत्ता सातवीच्या इतर इतिहास आणि नागरिकशास्त्र अभ्यास पाठांचे स्वाध्याय शोधण्यासाठी:

Previous Post Next Post

نموذج الاتصال